खरे खोटे काय ते ठरविणे हे ह्या चर्चेचे उद्देश्य नाहि. भारतिय घटने द्वारे प्रदत्त एका मुलभुत अधिकारान्बद्दल चर्चा मी येथे आमंत्रीत करीत आहे.
जसे भाषण, संचार इ. स्वातंत्र्य आहे तसेच स्थावर व जंगम संपत्ती संपादनाच मुलभुत हक्क सुरुवातिला होता.
पण सर्व प्रथम पंतप्रधान ज.ला. नेहरू याना समाजवादाची दारुची नशा अशी चढली होती के त्यानी हा अधिकार घटने दुरुस्ती द्वारे काढुन घेतला.
आज कश्मिर राज्याला असलेल्या विशिष्ट परिस्थिती मुळे आपण तेथे स्थावर व जंगम संपत्ती विकत घेउ शकत नाहि. पण इतरत्र घेउ शकतो.
पाकिस्तान, बांगलादेश मध्ये तर शत्रू संपत्ती कायदा आहे ज्यात निर्वासित झालेल्या हिंदुची संपत्ती स्थानीक नागरिक राजरोस पणे घेउ शकतात त्याची खरेदी विक्री हि करू शकतात. आज बहुराष्ट्रिय बैंकाना मुक्त बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे तर मग आमचे हात का बांधून ठेवले आहेत?
माझे तुम्हा सर्व सुविद्य मंडळिना विनम्र निवेदन आहे कि आपण या मुलभुत अधिकाराची पुनः आवश्यकता आहे कि नाही.

देश म्हणजे काय? देशावर प्रेम म्हणजे कोणावर?
भारतातील भूमी म्हणजे देश?
का भारतीय संस्कृती म्हणजे देश?
का भारतीय माणसं म्हणजे देश?
जे प्रेम करण्याएव्हडे प्रगत असतात, त्यांना धर्म, भाषा ..... देश अशा कुठल्याच कारणांची आवश्यकता नसते. असे लोक दुसऱ्याच्या देशालाही मान देतात.
आपल्या राष्ट्रगीताला, सिनेमागृहात परदेशी लोकांनाही उभं रहिलेलं पाहिलं आहे, आणि आपल्या लोकांना बसलेलं.
स्वतःचा ज्यांना अभिमान आहे त्यांकडून सगळ्यांनाच योग्य मान मिळतो.
प्रेमाला देशाची बंधन नाहीत.
आणि बाकीचे............... त्यांना प्रेम आणि आपुअलकी वाटण्यासाठी देशाच्या सीमाही अपुऱ्याच.
__________________________________________________________
आज कालच्या कोणत्या नेत्याच्या वागण्या मधून देशप्रेम व्यक्त होते. आठवा स्वातंत्र्य लढ्याचे दिवस , तेंव्हाचे नेते आणि त्यांच्या आवाहनांना प्रतिसाद देणारी जनता.
-
-
-
लहानपणापासून ते कॉलेजचे शीक्शण पूर्ण झालं तोपर्यंत तरी माझं माझ्या देशावर, ह्या भारतावर प्रेम होतं. आता तीच भावना मला बालीश वाटते. सध्या तरी स्वतः पूरता वीचार करायचा, जे आजूबाजूला घडतंय त्याचा आपल्यावर कूठलाही परीणाम होणार नाही याचीच खबरदारी घेत जीवन व्यतीत करणं, हा योग्य मार्ग वाटतो.
देशात राहून आपलं पोट भरण्याठी काम करणं व कर भरणं मला तरी हीच देशसेवा वाटते.
देशभक्ती वा देशप्रेम अमूक एका पद्धतीनेच व्यक्त करायला हवं असे नीर्देश असता कामा नयेत.
__________________________________________________________________
आजच्या पिढीने (माझ्यासकट) पारतंत्र्य म्हणजे काय हे पाहिलेले नाही. त्यांच्या मनात देशप्रेमाविषयी तीच भावना येईल अशी अपेक्षा कितपत बरोबर आहे?
याचा अर्थ हा प्रतिसाद देशविरोधी आहे असा लावू नये. पण स्वातंत्र्यदिन साजरा करतना आपण नेमके काय करतो? आणि जे काही करतो त्यामुळे समाजाला कितपत फायदा होतो?
हॅम्लेट
_________________________________________________________________
पण देशप्रेमासमवेत सर्व ठिकाणी देशहितास प्राधान्य देण्याची गरज पूर्ण होत नाही. मी मागे एक चर्चाविषय येथे लिहिला होता, त्यात याबद्दल सविस्तर लिहिले होते. दुवा
तसे होईल तो दिवस सुदीन खरा.
___________________________________________________________________
चर्चा प्रस्ताव आला मंगळ., २९/०७/२००८ - १३:३९ त्यावर विचार मांडले आहेत केवळ ५ च. आज १ महिना होउन गेल्या वरही आपण अश्या प्रकारच्या चर्चेसही प्रतिसाद देत नाही किती दैव दुर्विलास हा! खरोखरच भारतमाता दुर्दैवी कि तिला हे असे कुपुत्र मिळाले.