Friday, October 03, 2008

मुलभुत हक्क आणि एस. इ. झेड.: संदर्भ टाटा नेनो प्रकल्प


सिंगुर प्रकरण एक प्रकाराने गाजले ते चांगलेच झाले. पण एका प्रकल्पाची हत्या केल्याचा आरोप सुश्री ममताजी वर लागला.
खरे खोटे काय ते ठरविणे हे ह्या चर्चेचे उद्देश्य नाहि. भारतिय घटने द्वारे प्रदत्त एका मुलभुत अधिकारान्बद्दल चर्चा मी येथे आमंत्रीत करीत आहे.
जसे भाषण, संचार इ. स्वातंत्र्य आहे तसेच स्थावर व जंगम संपत्ती संपादनाच मुलभुत हक्क सुरुवातिला होता.
पण सर्व प्रथम पंतप्रधान ज.ला. नेहरू याना समाजवादाची दारुची नशा अशी चढली होती के त्यानी हा अधिकार घटने दुरुस्ती द्वारे काढुन घेतला.
आज कश्मिर राज्याला असलेल्या विशिष्ट परिस्थिती मुळे आपण तेथे स्थावर व जंगम संपत्ती विकत घेउ शकत नाहि. पण इतरत्र घेउ शकतो.
पाकिस्तान, बांगलादेश मध्ये तर शत्रू संपत्ती कायदा आहे ज्यात निर्वासित झालेल्या हिंदुची संपत्ती स्थानीक नागरिक राजरोस पणे घेउ शकतात त्याची खरेदी विक्री हि करू शकतात. आज बहुराष्ट्रिय बैंकाना मुक्त बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे तर मग आमचे हात का बांधून ठेवले आहेत?
माझे तुम्हा सर्व सुविद्य मंडळिना विनम्र निवेदन आहे कि आपण या मुलभुत अधिकाराची पुनः आवश्यकता आहे कि नाही.

Saturday, September 20, 2008

शिवाजी राजांचे गुरू कोण?

शिवाजी राजांचे गुरू त्यांचे आई-वडिल आणि त्याहीपेक्षा अधिक तत्कालीन राजकारण असावे असे वाटते. तरी खाली काही प्रश्न आहेत -
प्रश्न उपस्थित करणे हा एक लोकप्रियता (तिहि फाजिल) मिळविण्याचा राजमान्य राजरस्ता झाला आहे. ह्या अश्या पोरकट व्यापामधे मि पडणार नव्हतो पण जबाबदारि म्हणुन् घेतलि सबब हा उत्तरान्चा सन्च. खरे तर या सर्व प्रश्नान्चि उत्तरे कानाखालि ओढणे एक हाच आहे.
इतिहास हा कधि हि तटस्थ व्रुत्ति ने लिहिला जातो.
इति + ह + आस = इतिहास
जो जसा घडला तसा लिहिला जातो.
यात जर - तर ला थारा नसतो. जे घडले तसेच्या तसे लिहिले जाते.

१. पुणे-जुन्नर भागातील शहाजी राजांची जहागिर अदिलशाही आणि मोघलांनी बेचिराख करून टाकली होती. त्या भागातच जिजाबाईंना पाठवण्यात शहाजीराजांचे कोणते राजकारण असावे?
आजकाल जशि नोकरि केलि जाते तशि नोकरि शहाजि राजे यान्चे काळात केलि जात नव्हति. मुघलान्कडे तर सैनिकाना पगारच दिला जात नव्हता तर लुटिचा हिस्सा मिळत होता. रोख पगारि सैनिक हि प्रथा मुळात शिवाजि राजानी सुरु केलि. त्यामुळे शिवाजि महाराज व जिजाबाइ येथे राहुन आपलि जहागिर व शेतिभाति साम्भाळतिल यात शुद्ध हेतु हाच असावा.कारण जरि जहागिर नसलि तरि शेति भाति तरि करणे गरजेचे होतेच. त्याच बरोबर् इतर् मराठि जनता हि शेति करुन निटनेटके राह्तिल.


२. जिजाबाईंशी जाधव घराण्यामुळे त्यांचे विशेष सख्य नव्हते म्हणावे की जिजाबाईंचा मुत्सद्दीपणा पाहून त्या आणि लहान राजे लांब राहून आपले स्वप्न पुढे चालवू शकतील असा त्यांना विश्वास होता हे कळत नाही. जिजाबाई पुण्यात स्थायिक होत असता त्यांच्यासह हुशार सल्लागार आणि अमात्य देण्यात शहाजी राजांचे डावपेच होते काय?


याला काहि अर्थ नाहि. आपल्या मुला बायको सोबत हुशार अमात्य देणे हे गरजेचे का नाहि वाटणार? राज्य कारभार चालविणे हे एक टिमवर्क असते. जरि जिजाबाई मुत्सद्दि असल्या तरि एकट्याचिच जबाबदारि वर सोडणे त्याना बरोबर् वाटले नसेल्.

३. तरूण वयात दहा-पंधरा मावळ्यांच्या साथीने राज्य उभारण्याचे स्वप्न पहाणे शक्य असले तरी साकारणे कठिण होते. शहाजीराजांचा याला अव्यक्त पाठिंबा होता काय?
अर्थातच का नव्हता. वेळो - वेळि तो प्रत्यक्ष दिसुनहि आला होता.

४. रामदास स्वामी आणि तुकाराम हे राजांना खचितच गुरूस्थानी असावेत परंतु राजकारणात किंवा राजांना घडवण्यात यांचा सहभाग किती?

हे दोघेहि सन्त म्हणुन अर्थातच मोठे आहेतच् पण रामदास स्वामिन्चे महत्व आणि सहभाग आहेच आणि तो श्लोकबद्ध हे झाला आहे. उदा. विजापुरहुन सरदार निघाला आहे अशि रचना करुन् एक सन्देश अफझलखानाच्या वेळि पाठविला होता.

Friday, August 29, 2008

एक तोळा देशभक्ती

आपण आपल्या देशावर किती प्रेम करतो?

जर हा प्रश्न एका लहान मुलाला विचारला तर तो हात जेव्हडे ताणता येतील तेव्हडे ताणून म्हणेल "एव्हड प्रेम करतो". तरुण मुलाला विचरल तर तो म्हणेल खूप प्रेम करतो... आणि दोन मिनीटानी समोरचा सिग्नल न बघता सुसाट निघून जाइल.

दोन वर्षपूर्वी मी इंडोनेशिया मध्ये गेलो होतो. तिथे सगळीकडे रंगरंगोटी केली होती. सगळी कार्यालये सजवली होती. मी सहज विचारलं तर अस कळालं की १ महिन्यापूर्वी त्यांचा स्वातंत्र्यदीन होता.

ह्याउलट जर तो मनुष्य आपल्यकडे आल असता तर.. अगदी १५ ऑगस्टला ही आला असता तरीही त्याला रस्त्यावर चिखलात पडलेले.... त्याच्यावरून गाड्या गेलेले.... काहींवर रीबॉकच्या बूटांचे ठसे उमटलेले झेंडे मिळाले असते. विश्वास बसत नसला तरीही हे सत्य आहे. मी स्वतः असे कित्येक झेंडे उचलून घरी आणून ठेवले आहेत.

काहींसाठी हा दिवस तर लाँग विकेण्डचा असतो... "कुठेतरी टुर वर जाउयात मस्त!"

काही लोक कसेबसे उठून पोरांना शाळेत सोडायला जातात. आणि हो.... आम्ही टी. व्ही. वरचा देशभक्ती पर पिक्चर बघतो हं! न्यूज वाहीन्यान्साठी हा दिवस भरपूर कमावण्यासाठी असतो. काहिही प्रश्न... करा एस एम एस!

अशीच आपली देशभक्ती... १ तोळा... १/२ तोळा!

आपण खरच प्रेम करतो आपल्य देशावर?

______________________________________________________________

टिचकी मारून प्रतिसाद उघडावा/मिटावा." class="subject">आपण खरच प्रेम करतो आपल्यावर?

देश म्हणजे काय? देशावर प्रेम म्हणजे कोणावर?

भारतातील भूमी म्हणजे देश?

का भारतीय संस्कृती म्हणजे देश?

का भारतीय माणसं म्हणजे देश?

जे प्रेम करण्याएव्हडे प्रगत असतात, त्यांना धर्म, भाषा ..... देश अशा कुठल्याच कारणांची आवश्यकता नसते. असे लोक दुसऱ्याच्या देशालाही मान देतात.

आपल्या राष्ट्रगीताला, सिनेमागृहात परदेशी लोकांनाही उभं रहिलेलं पाहिलं आहे, आणि आपल्या लोकांना बसलेलं.

स्वतःचा ज्यांना अभिमान आहे त्यांकडून सगळ्यांनाच योग्य मान मिळतो.

प्रेमाला देशाची बंधन नाहीत.

आणि बाकीचे............... त्यांना प्रेम आणि आपुअलकी वाटण्यासाठी देशाच्या सीमाही अपुऱ्याच.

__________________________________________________________

टिचकी मारून प्रतिसाद उघडावा/मिटावा." class="subject">नेते

आज कालच्या कोणत्या नेत्याच्या वागण्या मधून देशप्रेम व्यक्त होते. आठवा स्वातंत्र्य लढ्याचे दिवस , तेंव्हाचे नेते आणि त्यांच्या आवाहनांना प्रतिसाद देणारी जनता.

टिचकी मारून प्रतिसाद उघडावा/मिटावा." class="subject">देशभक्तीची व्याख्या!

-

-

-

लहानपणापासून ते कॉलेजचे शीक्शण पूर्ण झालं तोपर्यंत तरी माझं माझ्या देशावर, ह्या भारतावर प्रेम होतं. आता तीच भावना मला बालीश वाटते. सध्या तरी स्वतः पूरता वीचार करायचा, जे आजूबाजूला घडतंय त्याचा आपल्यावर कूठलाही परीणाम होणार नाही याचीच खबरदारी घेत जीवन व्यतीत करणं, हा योग्य मार्ग वाटतो.

देशात राहून आपलं पोट भरण्याठी काम करणं व कर भरणं मला तरी हीच देशसेवा वाटते.

देशभक्ती वा देशप्रेम अमूक एका पद्धतीनेच व्यक्त करायला हवं असे नीर्देश असता कामा नयेत.

__________________________________________________________________

टिचकी मारून प्रतिसाद उघडावा/मिटावा." class="subject">संबंध
याचा संबंध देशप्रेमाशी कमी आणि सार्वजनिक स्वच्छतेशी जास्त वाटतो आहे. आधी अनेकदा म्हटल्याप्रमाणे जेव्हा सार्वजनिक स्वच्छता आणि सिव्हिक सेन्स आपल्याकडे येईल तो आपला सुवर्णकाल. परदेशातही अनेक लोक स्वातंत्र्यदिनाचा दिवस सुट्टी म्हणून घेतात. सगळे मानसिकतेवर अवलंबून आहे. कुठलीही गोष्ट त्याच इंटेंसिटीने वर्षानुवर्षे करणे अवघड असते.
आजच्या पिढीने (माझ्यासकट) पारतंत्र्य म्हणजे काय हे पाहिलेले नाही. त्यांच्या मनात देशप्रेमाविषयी तीच भावना येईल अशी अपेक्षा कितपत बरोबर आहे?
याचा अर्थ हा प्रतिसाद देशविरोधी आहे असा लावू नये. पण स्वातंत्र्यदिन साजरा करतना आपण नेमके काय करतो? आणि जे काही करतो त्यामुळे समाजाला कितपत फायदा होतो?
हॅम्लेट
_________________________________________________________________

टिचकी मारून प्रतिसाद उघडावा/मिटावा." class="subject">प्राधान्य देण्याची गरज...
देशभक्ती आहेच, त्यास दुसरा काही मतभेद असणे नाही.
पण देशप्रेमासमवेत सर्व ठिकाणी देशहितास प्राधान्य देण्याची गरज पूर्ण होत नाही. मी मागे एक चर्चाविषय येथे लिहिला होता, त्यात याबद्दल सविस्तर लिहिले होते. दुवा
तसे होईल तो दिवस सुदीन खरा.
___________________________________________________________________

टिचकी मारून प्रतिसाद उघडावा/मिटावा." class="subject">एक तोळा देशभक्ती नवीन
हा चर्चेचा प्रस्ताव सुद्धा किती लोकानी वाचला; त्यावर विचार केला, आपले मत मांडले?
चर्चा प्रस्ताव आला मंगळ., २९/०७/२००८ - १३:३९ त्यावर विचार मांडले आहेत केवळ ५ च. आज १ महिना होउन गेल्या वरही आपण अश्या प्रकारच्या चर्चेसही प्रतिसाद देत नाही किती दैव दुर्विलास हा! खरोखरच भारतमाता दुर्दैवी कि तिला हे असे कुपुत्र मिळाले.