एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ
जेव्हा दोन अनोळखी मराठी माणसे भेटतात तेव्हा ते एक तर हिंदी मध्ये संभाषण करतात व काहीश्या संशयाने वा खत्रुडपणाने वागतात (उदा. रेल्वे ट्रेन मध्ये प्रवासी मराठी सौजन्य इ. ) याच्या बरोबर उलट अन्य भाषिक आपल्या बांधवांशी सलोख्याने वागताना दिसतात.
सरते शेवटी हा प्रश्न राहतो की मग याचे उत्तर काय? महाराष्ट्रा बाहेरच मराठी माणूस नीट नेटका मिळून मिसळून राहतो व महाराष्ट्रा मध्ये त्यात भांडखोर राक्षस संचारतो की काय? असे असेल तर आपण मुंबई सह समस्त महाराष्ट्र अन्य भाषिकांना देऊन टाकवी आणि अन्यत्र जावे. जिथे आपण सुसंस्कृत पणे वागू. एकीने राहू.
_________________________________________________________________
-
-
-
आपले वीचार मला अजीबात आवडले नाहीत. आपण आम्हा महाराष्ट्रींना राक्शस म्हणता. आपण परप्रांतात रहायला काय गेले, तूम्हाला त्यांच सगळं गोड-गोड लागायला लागलं. महाराष्ट्र अन्य भाषीकांना देण्याएवजी आपणच सूस्त व आळशी असणाऱ्या मध्यप्रदेशात राहायला गेलात ते बरचं केलं. तेंव्हा आता तीकडचाच व त्यांचाच वीचार करा.
__________________________________________________________________
मध्य प्रदेश आळशी सुस्त इ. ताशेरे ओढणारे तुम्ही कोण ? माझ्या लेखात मी असेही लिहिले होते कि आता मि परत महाराष्ट्रातच आलो आहे. आणि माझा मराठी लोकांचा आलेला अनुभव मी मांडला. त्यातही मला टिपीकल मराठी अनुभव मिळाला. तुम्हीच माझा मुद्दा सिद्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.
वो प्रे. प्रथम येथे (शुक्र., २२/०८/२००८ - १२:१६).
नाही! महाराष्ट्राबाहेरही तो भांडतो. माझ्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ मी आपल्याला भुबनेश्वरला येण्याचे निमंत्रण देत आहे. म्हणजे खातरजमा होईल.
विनोद जरा बाजूला ठेवून माझे एक निरीक्षण सांगत आहे. माझ्या मते सर्व प्रांतीय आपल्या प्रांतातील लोकांबद्दल थोड्याफार फरकाने असेच म्हणत असतात. पाटीतल्या खेकड्यांची गोष्ट ओरिसातील लोकही अगदी चवीने सांगत असतात!
____________________________________________________________________